मा कश्चित दुःख भागभवेत
# # # # #
झोप
डोळ्यात दाटते तेव्हा वर्तमानाचे कढ मनात दाटून यायला लागतात. चांगल्या-वाईट, कठीण-
मृदू, आंबट
- गोड आठवणीत मन रमून जायला होतं. खिडकीबाहेरची चंद्रकोर ह्या साऱ्या सुख -
दुःखांवर चांदण्याची सारखीच
पखरण करते, तेव्हा ह्या सगळ्या भवसंसाराचं फोलपण अंगावर
धावून येतं. एका कुशीवर वळताना एरवी शांत झालेलं मन विचारांत धावायला
लागतं तेव्हा कुठे आतल्या असण्याची जाणीव सुस्पष्ट होत जाते.
अपार दुःखाच्या घड्यांमध्ये मनाचं गुरफटून जाणं पण सवयीचं होत जातं. आपसूक दुःखाशी असणं
सोयीचं होतं. सुखाची चटक सगळ्यांनाच असते. पण दुःखाची चटक एकदा लागली की की
त्यातून सुटणं कर्मकठीण. दुःखाचं वलयांकित होत जाणं. (©अधोरेखित )
ह्या
असल्या विचारांच्या गाड्या जोडत जोडत झोप गडद होत जाते. सरते
शेवटी मग भावना बोथट होत जातात तेव्हा आतली एक एक निरगाठ सुटत
जाते आणि श्वास मोकळे होत जातात. शेवटी दुःखाचे सोहळे रंगवून झाले आणि
नव्या दुःखाची उजळणी झाली की मग
मन झोपायला मोकळं. उद्याच्या निर्धारावर मनाला अलगद मोकळं सोडलं की
सगळा ब्रम्हानंदच.
# # # # #
No comments:
Post a Comment